भारत जोडो यात्रा की काँग्रेस जलाओ यात्रा !
#POST : भारत जोडो यात्रा कि कॉंग्रेस जलाओ यात्रा ? 'भारत जोडो यात्रा' या नावाने काँग्रेस ने एक पदयात्रा सुरु केलेली आहे. हा 'विचार' जरी चांगला असला तरी तो काँग्रेस च्या तोंडातून येणं हे मनाला, इतिहासाला आणि सामान्य जनतेला न पटणारं आहे. ह्याच गोष्टीची पुष्टी एक दो न दिवसांपूर्वी झाली, जेव्हा काँग्रेस च्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल्स वरून संघाच्या गणवेशाला 'आग' लावलेला फोटो पोस्ट करण्यात आला. खरंतर, या गोष्टीमुळे संघाला आणि संघ स्वयंसेवकांना काहीही फरक पडणार नाही, पण, काँग्रेस ची हि 'संघाबद्दल असलेली भित्री' बाजू सगळ्यांसमोर येणं गरजेचं आहे. १९२५ साली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यापासून, काँग्रेस हा संघाच्या विरोधात उभा राहिला आहे. खरंतर, परामपूजनीय आद्यसरसंघचालक डॉ.हेडगेवार हे देखील इतर स्वातंत्र्य सेनान्यांप्रमाणे काँग्रेस चे सदस्य होते आणि केवळ सदस्यच नाही तर काँग्रेस मधील एक बलशाली आवाज देखील होते. पण, काँग्रेस चे होणारे वैचारीक पतन, भारतीयत्वापासून दूर जाण्याचे त्यांचे अनाहूत प्रयत्न, अल्पसंख्याक तुष्टीकरणामुळे बहुतांश लोकांच्या विरोधात आ